नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी अपडेट! पहिल्या टप्प्यात 5 शहरांसाठी थेट विमानसेवा, कधीपासून होणार सुरुवात?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच हा विमानतळ प्रवाशांसाठी खुला होणार असून पहिल्या टप्प्यात पाच मोठ्या शहरांना जोडला जाणार आहे. यात नेमक्या कोणत्या शहरांचा समावेश असेल ते जाणून घेऊयात.
'या' शहरांचा असणार समावेश मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपनीकडून नवी मुंबई विमानतळावरून दररोज दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून 15 पेक्षा जास्त शहरांसाठी 20 फ्लाइट्स दररोज ऑपरेट केल्या जाणार आहेत. आगामी काळात म्हणजेच 2026 पर्यंत या संख्येत वाढ करून एकूण 55 फ्लाइट्स चालवल्या जातील, ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन हब ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
'या' शहरांचा असणार समावेश मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपनीकडून नवी मुंबई विमानतळावरून दररोज दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून 15 पेक्षा जास्त शहरांसाठी 20 फ्लाइट्स दररोज ऑपरेट केल्या जाणार आहेत. आगामी काळात म्हणजेच 2026 पर्यंत या संख्येत वाढ करून एकूण 55 फ्लाइट्स चालवल्या जातील, ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन हब ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.